सुविचार: विचार थोडे से हट के

विचार थोडे से हट के


परफेक्ट जोड्या फक्त चपलाच्या असतात बाकी सगळ गैरसमज आहे.

कचरापेटीत पडलेली भाकरीच सांगते की माणूस पोट भरल की त्याची लायकी विसरतो.

जेवताना शेतकऱ्याचे आणि झोपताना सैनिकाचे आभार मानायला विसरु नये.


कोणतेही कर्म करा पण एक गोष्ट विसरु नका परमेश्वर नेहमी ONLINE असतो.


SORRY माणसाने म्हटले की भांडण संपते आणि डॉक्टरनी म्हटले की माणूस संपतो.


नातं हृदयातून असाव रक्ताची नातं हल्ली वृद्धश्रमात सापडतात.


लाकडाच्या ओंडक्यानी भरलेल्या ट्रकच्या फळीवर लिहिले होते "झाड़े लावा झाड़े जगवा" 


नाती जीवंतपणीच संभाळा ताजमहल जगाने पाहिला पण मुमताजने नाही.


"चमचा" ज्या भांडयात असतो त्यालाच तो रिकामा करतो "चमच्या" पासून सावध रहा.


"उपवास" नेहमी अन्नाचाच का करता? कधी कधी क्रोधाचा आणि वाईटाचाही करा.


"भावना" ही जगातील सर्वात खतरनाक नदी आहे ह्यात सगळे वाहून जातात.

Post a Comment

0 Comments