भारतीय संस्कृतीचे महत्व

*चुंबन, आलिंगन फार दूर राहिलं, हस्तांदोलन सुध्दा आमच्या संस्कृतीत वर्ज आहे. एका ताटात जेवणं, एकमेकांचे उष्टं खाणं, हेही हिन्दू संस्कृतीत मान्य नाही. शैशव संपलं की मुलं सुध्दाआई-वडलांचंही उष्टं खात नव्हते, आजही जुन्या घरांमध्ये हा नियम पाळला जातो. जेवताना अन्न मधोमध घेऊन , ज्यानं त्यानं लागेल तसे आपल्या हातानं वाढून घेणं असंस्कृत मानलं गेलंय. याला उष्टेटाळ वा उष्टा विटाळ असा शब्दप्रयोग प्रचलित आहे. बाहेर जाऊन आल्यावर सर्वप्रथम हातपाय धुवूनच घरात यावे असा दंडक आजही अनेक हिंदू घरात आहे, आणि पाळलाही जातो. सकाळी झोपेतून उठल्यावर स्नान झाल्याशिवाय चुलीला (आता गॅस) स्पर्शही करायला परवानगी नाही. काय खावं किंवा खाऊ नये, कधी खावं, कशा सोबत काय खावं, खाताना कसं बसावं, या सगळ्यांचा अतिशय बारकाईने, सखोल अभ्यास झाला आहे.  असो . अशा शेकडो गोष्टी सांगता येतील. पण आम्ही इंग्रजांच्या गोऱ्या कातडीनं एवढे प्रभावित झालो की आम्हाला पाश्र्चात्य संस्कृतीचं प्रचंड आकर्षण वाटायला लागलंय. ते जे काय करतात, वागतात त्याचंच अनुकरण करायला लागलोय. वरील नियमांचं, त्यांचं महत्त्व समजून, श्रध्देनं पालन करणाऱ्यांची कुचेष्टा करणं,  आम्ही आधुनिक असल्याची खूण बनली आहे. खरेतर आमची प्रत्येक कृती विज्ञानाला धरून आहे. पण आमच्यातील न्यूनगंड आमच्या विज्ञानाधिष्टित धर्म आणि संस्कृती यांची कुचेष्टा करायला आम्हाला भाग पाडतो.*
*पण अलिकडच्या काळात रोज नवनवीन नैसर्गिक संकटं, साथींचे रोग, शारिरिक व मानसिक आजार उत्पन्न होत आहेत, त्यामुळं जगाला भारतीय संस्कृतीतील एकाएका गोष्टीचं महत्त्व उलगडत आहे.* 
*आमचे ऋषी मुनी ज्ञानी होते,जीवनाच्या प्रत्येक अंगाचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता. गरज आहे ती आपल्यातील न्यूनगंडाची भावना त्यागून पाश्र्चात्यांचं अंधानुकरण टाळण्याची. आणि म्हणूनच म्हणायचं "गर्व से कहो हम हिन्दू है |"*

*(करोना वायरसच्या आलेल्या नियमावली निमित्ताने)*

Post a Comment

0 Comments